Service Alert
Entretien du site web le 24 avril à 22h HAE
Le site web sera indisponible le 24 avril à 22h HAE pour 15 minutes en raison de travail d'entretien prévu.
Le site web sera indisponible le 24 avril à 22h HAE pour 15 minutes en raison de travail d'entretien prévu.
Articles 1 à 20 sur 44
Par Dr Hrishiskesh Pradeep Bodhe. 2023
स्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय…
काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…Par Ranjeet Desai. 1962
महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई: मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली…
'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.Par Shobha De. 2004
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम... शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच…
शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे. हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे.Par Zig Ziglar. 1977
'सी यू एट द टॉप' या त्यांच्या सर्व विक्रम मोडणाऱ्या अफलातून पुस्तकाची 25 वी रौप्यमहोत्सवी सुधारित आवृत्ती काढण्यात येत असून,…
हे पुस्तक म्हणजे वैयक्तिक विकास आणि वैयक्तिक यशासाठी काळाच्या चाचणीवर उतरलेलं सूत्र घेऊन पायरीपायरीने स्पष्ट करणारं अभिजात अमेरिकन पुस्तक आहे. ज्यांना या पुस्तकातील तत्त्वांनी मार्गदर्शन केले आहे, अशा वाचकांच्या पिढ्यांसाठी, त्या काळासाठी यातील तत्त्वज्ञान खरे ठरले आहे. 'सी यू अॅट द टॉप'चा अजूनही महामंडळ, शाळा, सरकारी संस्था, विक्री संस्था आणि सुधारगृहांसारख्या संस्थांमध्ये, जिथे कार्यप्रेरणा आणि स्वविकास ही महत्त्वाची ध्येयं असतात अशा ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि तरुण लोकांसाठी उपयुक्त ठरलेल्या 'आय कॅन (मी करू शकतो)' या अभ्यासक्रमाचा हे पुस्तक पाया ठरले आहे.Par Sadashiv Shankar Desai. 1989
पोर्तुगाल ही हिंदुस्थानच्या जलमार्गाचा शोध लावणारी पहिली युरोपियन सत्ता. तथापि पोर्तुगीजांच्या पूर्वी अरब प्रवासी आणि व्यापारी हिंदुस्थानात जलमार्गाने व खुष्कीच्या…
मार्गाने येत असत. मध्ययुगीन कालात अरब व्यापाऱ्यानी आणि विचारवंतानी भारतीय माल आणि भारतीय तत्वज्ञान आफ्रिका मार्गे युरोपात पोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. योगायोगाची किंवा दुर्दैवाची गोष्ट ही की, पोर्तुगीज नावाड्याना हिंदी महासागरात आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या समुद्रात आणून सोडण्यास अरबच कारणीभूत ठरले. असे सांगतात की, पोर्तुगीज लोकानी हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीच्या अद्भूतरम्य कथा कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. त्यामुळे सोन्याचा धूर वाहात असलेल्या ह्या समृद्ध देशात जाऊन तेथील धनसंपत्ती लुटून आणून आपला गरीब देश श्रीमंत करावा, ह्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन ते हिंदुस्थानच्या शोधार्थ बाहेर पडले. आता हा मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामधील संबंधाचा इतिहास प्रकाशात येत आहे.Par Ranjeet Desai. 1981
महाराष्ट्र, पश्चिम भारतातील राज्य, तेराव्या शतकापासून मुस्लिमांच्या अधिपत्याखाली होते. सुमारे चारशे वर्षे बाहेरून अत्याचारी आणि असहिष्णू राजे होते ज्यांनी स्थानिक…
लोकसंख्येला शांततेत जगू दिले नाही. सतराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना आव्हान देऊन मराठा साम्राज्याची स्थापना करेपर्यंत लूट, धर्माच्या नावाखाली शोषण, बलात्कार आणि हिंसाचार सुरूच होता. त्याचे मिशन केकवॉक नव्हते: त्याचे आतून, राज्याबाहेरचे शत्रू होते तसेच इतर देशांतील (पोर्तुगीज आणि ब्रिटीशांनी त्यांचे सध्याचे फ्लोली फेल्ट बनवले होते) किंवा छत्रपती शिवाजींना मदत करणारा घटक महाराजांनी एक साम्राज्य निर्माण केले ज्याचा विस्मय होता. पावनखिंड ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे जी पावनखिंडच्या युद्धाकडे नेणाऱ्या घटनांचा समावेश करते. (पावनखिंड हा कोल्हापुर जवळचा रस्ता आहे.) राजाने खिंडीला वेढा घालून यशस्वीपणे मार्ग काढला; बाजी प्रभू देशपांडे यांना धन्यवाद ज्यांनी ब्रेक थ्रू शक्य केला.Par Dr G. E. Bomma. 1973
डॉ. जी. ई. बोमाँ लिखित “Medicine: Essentials For Practitioners and Students” या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉ. मधुकर रानडे, मुंबई यांनी…
ग्रंथविषयाची माहिती मूळ ग्रंथकाराप्रमाणेच देऊन पण मराठी भाषेच्या प्रकृतीशी मेळ बसेल अशारीतीने केला आहे. तसेच डॉ. बोमाँ यांच्या मूळ ग्रंथातील मूलभूत वैद्यकविज्ञान मराठी भाषांतरात कायम ठेवले असून भारतीय संदर्भात मूळ ग्रंथाचा विषय नीट स्पष्ट करण्यासाठी डॉ. रानडे यांनी, मूळ प्रकाशकांच्या परवानगीने, सदर भाषांतरात आवश्यक ते बदल केले आहेत.Par Abhishek Dalavi. 2018
ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे. आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत. काहींनी इतिहास बनवला तर…
काही इतिहासात हरवून गेल्या. आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही. आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात. जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे. या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं. काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी, काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा, काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात. काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो. काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो. लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही. लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे. ज्यांची कुटुंब, शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत. पण त्याचं प्रेम, आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत. आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे, नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा.Par T. V. Parvate. 1985
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक नवीन पर्व सुरु केले. १ ऑगस्ट, १९२० ला लोकमान्य टिळकांचे…
निधन झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीची धुरा महात्मा गांधीजींच्या खांद्यावर आली आणि ३० जानेवारी, १९४८ ला त्यांची हत्त्या होईपर्यंत ते राष्ट्राचे एकमेव असे नेते राहिले. त्यांच्या हयातीतच सामुदायिक असहकाराची चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो इत्यादी चळवळी झाल्या. आणि शेवटी त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय चळवळी केल्या नाहीत तर सामाजिक चळवळीही फार मोठ्या प्रमाणात करण्याचे श्रेय त्यांचे आहे. चरखा संघ, ग्रामोद्योग संघटना, कुष्ठरोग निवारणाची चळवळ इत्यादी अनेक विधायक चळवळी पण त्यांनी सुरु केल्या.Par Dr K. L. Daptari. 1965
‘धर्मरहस्य’ हा निबंध हिंदुधर्माचा बुद्धिवादी पद्धतीने काढलेला उत्कृष्ट निष्कर्ष आहे. मानवी बुद्धि स्वतंत्र रीतीने ज्या पारलौकिक अतींद्रिय तत्त्वांचे किंवा सिद्धांतांचे…
आकलन करू शकत नाही अशा अमरत्व, ईश्वर, पुनर्जन्म, दिव्यदृष्टी इत्यादि तत्त्वांचा वा सिद्धान्तांचा अंगीकार न करता मानवी बुद्धीस समजू शकेल व पटू शकेल अशा हिंदुधर्मीय सिद्धान्तांची सुसंगत तर्कशुद्ध रचना या पुस्तकात केलेली आढळते. वेद, स्मृति व पुराणे या हिंदुधर्मशास्त्राच्या व धर्मेतिहासाच्या ग्रंथांचे दीर्घकालपर्यंत परिशीलन करून त्यांची व्यवस्थित उपपत्ती येथे मांडली आहे. या निबंधात वेद, स्मृती व पुराणे यांची ऐतिहासिक दृष्टीने मीमांसा करून त्यातील निष्कर्ष व्युत्पादिले आहेत. ऐतिहासिक पद्धती व ग्रंथप्रामाण्य पद्धती अशा दोन परस्परविरोधी पद्धती स्वीकारणारे हिंदुधर्म मीमांसकांचे दोन विरोधी संप्रदाय आहेत.Par Anand Nilkanthan. 2013
असुर: एका पराभूताची गोष्ट हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य, रामायण, खलनायकाच्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगणे आहे. कथा सामान्य आहे, कारण ऐतिहासिक कथा…
सांगणे सहसा विजेते सांगतात. असुर ही पराभूत झालेल्यांची कथा आहे आणि असुर लोकांची कथा सांगण्याचे धाडस करतो. असुर समाजाचे वर्णन देव कुळापेक्षा अधिक उदारमतवादी होते. हे रावण आणि भद्राच्या दृष्टीकोनातून महाबली, वामन आणि सीतेच्या अग्नी-परीक्षेची कथा देखील वर्णन करते. हे पुस्तक पौराणिक कथांमागील मानवी भावनांबद्दल बोलते आणि वाचकांना पूर्णपणे नवीन दृष्टीकोन देते.Par Nana Kunte. 1982
ही वाटचाल आहे माझ्या सार्वजनिक जीवनाचा मी स्वतः काढलेला आलेख. दर्यासारंग आंग्रे घराण्याची राजधानी, कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण अशा…
मोठ्या बिरुदांनी आमचे अलिबाग बाह्य जगाला परिचित असले तरी प्रत्यक्षात आजही त्याची लोकसंख्या दहा हजारांपलीकडे फारशी गेलेली नाही. अशा गावात माझे मॅट्रिकपर्यंतचे आयुष्य गेले. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी अलिबागजवळच्या नागाव या अष्टागरातील एका प्रमुख गावी आल्यापासून फक्त शेती-बागायती करणाऱ्या, पोटापुरते मिळविणाऱ्या शेतकरी कुटुंबातील नव्याने वकील झालेल्याचा मी मुलगा. एकत्र कुटुंब, प्रमुख व्यवसाय शेती-बागायत. अष्टागरातील शेतकरी कोणत्याही जातीचा असो, आपल्या शेतात, वाडीत स्वतः राबणारा आणि त्यात धन्यता मानणारा. आपले प्रौढ जीवन सार्वजनिक कामात घालवावे असे मला लहानपणापासून वाटत आलेले आहे. शिवाजीच्या मावळ्यांप्रमाणे स्वराज्याकरिता झटण्याचे आकर्षण. इतिहासात शिवाजीने आणि माझ्या बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेला धडा गिरवावा अशी स्वप्ने मी पाहात असे. प्रभू रामापेक्षा हनुमान किंवा शिवाजीपेक्षा तानाजीच मला जास्त आवडे. नाथमाधवांचा ‘सावळ्या तांडेल’ पुस्तकरूपाने आणि शिवरामपंत परांजप्यांची ‘गोविंदाची गोष्ट’ चित्रमयजगत् या मासिकात वाचलेली.Par John Grisham. 2015
चार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी, १९९२मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या…
बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणार्या कंपनीत ‘पार्टनर’ होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं – सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ! त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते! आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं – हो, अजूनही तो जिवंत आहे!Par Vinayak Sitaram Sarwate. 1921
आज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची…
स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.Par Norman Vincent Peale. 2014
द सिक्रेट या पुस्तकाच्या अगोदर आलेला द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकामुळे हजारो लोकांना परिपूर्ण जीवन प्राप्त होण्यास मदत…
झाली आहे. अभूतपूर्व विक्रमी खपाच्या या पुस्तकात डॉ. पील श्रद्धेची शक्ती कशी काम करते ते दाखवून देतात. या पुस्तकातील व्यवहारोपयोगी तंत्रांचा वापर केल्याने तुमचे आयुष्य उत्साहाने भरून जाईल. तुमच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही सिकाल की- सर्वोत्तमाची अपेक्षा कशी बाळगावी व ते कसे मिळवावे, तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर व स्वतःवर विश्वास करता ठेवावा, तुमच्या ध्येयसिद्धीसाठी शक्ती कशी विकसित करावी, चिंता करण्याची सवय सोडून ताणमुक्त जीवन कसे जगावे, वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध कसे सुधारावेत, तुमच्या परिस्थितीवर काबू कसा मिळवावा आणि स्वतःबद्दल दयाळू कसे बनावे.Par Baba Kadam. 2020
मराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे…
गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.Par Kanchan Kashinath Ghanekar. 2017
रेशीमगाठी पुस्तकातील काही लेख पूर्वी छापून आले असले, तरी ते जसेच्या तसे इथे छापलेले नाहीत. कारण ते लेख काही प्रसंगाने,…
संदर्भाने लिहिलेले असल्यामुळे ते आता कालबाह्य वाटण्याचा संभव होता. त्यामुळे त्यांचे पुनर्लेखन केले आहे. काही लेख छापताना काटछाट करून छापले गेले होते. ते या पुस्तकात पूर्ण स्वरूपात आहेत. पुस्तकात छायाचित्रांऐवजी रेखाचित्रे घालण्याचे ठरताच, ही कामगिरी श्री. वासुदेव कामत या निष्णात चित्रकारावर सोपविण्यात आली. या रेखाचित्रांसाठी लागणारी बरीचशी छायचित्रे आमच्या घरच्या संग्रहातीलच आहेत.Par Raja Mane. 2011
वसंतदादांचा जीवनकार्यकाल हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची…
मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे, हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करून ते राज्य करू शकले.Par Shreepad Kelkar. 1976
हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ‘ड्रिस्क्रिप्टिव्ह सोशिऑलॉजी’ च्या सूत्रानुसार पुढील संशोधन म्हणून हा ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सर ट्रस्टीजच्या विनंतीवरून प्रथम लिहिण्यात आला. सर्व…
जगातील मुस्लिम समाजाची समान धार्मिक श्रद्धेतून उद्भवलेली अशी जी काही समान वैशिष्ट्ये आहेत ती एक संपूर्ण विषय म्हणून अभ्यासण्याजोगी आहेत. इस्लाम धर्म मानणाऱ्या समाजांची जीवनपद्धती व रचना यांच्यावर इस्लाम धर्माचा किती व कसा प्रभाव पडलेला आहे याचा शोध घेणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे दोन खंड अनुक्रमे १९३१ व १९३३ मध्ये ‘सोशिऑलॉजी ऑफ इस्लाम’ या नावाने प्रकाशित झाले. त्यानंतर परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाच्या संदर्भात पहिल्या आवृत्तीमधील माहितींत जरूर त्या सुधारणा हे पुस्तक लिहिताना केल्या आहेत.Par Amish. 2016
राम राज्य. सर्वार्थानं संपूर्ण भूमी. अर्थातच याची किंमत मोजावी लागते. त्याने ती किंमत मोजली. भारत, इ. पू. ३४०० फुटीरतेमुळे अयोध्या…
कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानाचे परिणाम समाजात कोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एका समर्थ नेत्याची गरज असते. असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनांना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र. देशवासियांनी त्याला जरी यातना दिल्या तरी त्याचं आपल्या देशावर खूप प्रेम असतं. तो कायद्याचा पाठीराखा बनतो. त्याचे तीन भाऊ, त्याची पत्नी सीता आणि तो स्वतः त्या कोलाहलमिश्रीत अंधःकाराविरोधात ठामपणे उभे राहतात. इथरांनी ठेवलेल्या ठपक्यातून राम बाहेर निघू शकतो का? सीतेवरील त्याचं प्रेम त्याला प्राप्त संघर्षांतून तारून नेतं का? त्याचं बालपण उद्ध्वस्त करणाऱ्या राक्षसांच्या राजा रावणाचा बीमोड तो करतो का? विष्णूपदाला तो प्राप्त होतो का?